Home world news marathi चीनचे भारताविरोधात पाकिस्तानपेक्षा धक्कादायक कृत्य! बॉर्डरजळच्या राज्यातील 90 ट्क्के ठिकाणांची नावे बदलली...

चीनचे भारताविरोधात पाकिस्तानपेक्षा धक्कादायक कृत्य! बॉर्डरजळच्या राज्यातील 90 ट्क्के ठिकाणांची नावे बदलली आणि…

6
0

Source :- ZEE NEWS

China Rename Places in Arunachal Pradesh: पाकिस्ताचे हल्ले सुरु असतानाच चीनचे भारताविरोधात धक्कादायक कृत्. समोर आले आहे. पाकिस्तानपाठोपाठ चीनच्या कुरापती देखील वाढल्या आहेत. चीनने भारताच्या बॉर्डरजवळील 27 जागांची नावे बदलली आहेत. आतापर्यंत चीनने भारताच्या  बॉर्डरजळच्या राज्यातील 90 ट्क्के जागांची नावे बदलली आहेत. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं सडेतोड प्रत्युत्तर भारताने चीनला दिले आहे. 

बॉर्डरवर असलेल्या भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आला आहे. या ठिकाणी पाच शहरे, 15 टेकड्या, चार खिंड, दोन नद्या आणि एक तलाव यांचा समावेश आहे. चीनने ही नावे चिनी म्हणजेच मंदारिन भाषेत ठेवली आहेत. चीनने ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राच्या वेबसाइटवर या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. गेल्या आठ वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेशातील 90 हून अधिक ठिकाणांची नावे बदलली आहेत.   

चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिले आहे. “नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे”, असे उत्तर परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल बुधवारी एका निवेदनाद्वारे म्हणाले, “आम्हाला असे आढळून आले आहे की, चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही आमच्या सैद्धांतिक भूमिकेशी एकनिष्ठ असून नाव बदलण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध कर

माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना रणधीर जयस्वाल यांनी हे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “चीन अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक, हास्यास्पद प्रयत्न केला जात आहे. मात्र नावं बदलून वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार.

चीनने अरुणाचल प्रदेशवर फार पूर्वीपासून डोळा ठेवलेला आहे. हा त्यांचा भाग असल्याचा दावा चीनकडून सतत करण्यात येतो. ईशान्येकडील अनेक शहरांची नावे बदलून चीनकडून नवे नवे नकाशे जाहीर करण्यात येतात. 2024 साली चीनने अरुणाचल प्रदेशमधील 30 वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलून त्याची यादी जाहीर केली होती. भारताने ही यादी फेटाळून लावली होती. अरुणाचल प्रदेशवर दावा सागंणाऱ्या चीनकडून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेशमधील दौऱ्यावरही आक्षेप घेण्यात येतो.

SOURCE : ZEE NEWS